माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Tuesday, November 16, 2010

तू काही बोललास का ???

तू काही बोललास का 
कि मलाच भास होताहेत....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस  तेव्हापासून

 
तुझी गोड हाक...
नाहीतर नुसतच ....ए ऐक ना...
कान नुसतेच आसुसलेत शब्दन शब्द झेलायला....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
तू दिलेला मोगरा बघ कसा कोमेजून गेलाय
चांदण्यांचे चेहरे उतरून गेलेत....
उदास रातराणी....पाहवत नाही रे तिच्याकडे
बघ ना असच होतंय 
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
मोबाईल.....
पाहिजे त्यावेळी प्रिय जणांशी संवाद साधता येतो....
पाहिजे त्यावेळी??? 
फेकून द्यावासा वाटतो मग.....
बघ ना असच होतंय 
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
खिडकी मध्ये किती येरा-झाऱ्या झाल्या असतील.....
कितीदा उगीचच दार उघडून बघितले असेन.....
वाटतं.....तु पाहतोयस माझी बेचैनी...आणि कळतंय तुलाही....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
काय करायचं रे मी अशा क्षणाला???
तुझी नितांत गरज आहे....तुझ्या मिठीत विसरून जायचय जगाला....
बोल ना....तुझा अबोला जीव घेतो माझा....
अं.......काही बोललास का???
नाही मला भासच होताहेत......

1 comment:

  1. छान झाली आहे कविता,मला आवडली...

    ReplyDelete